कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले आहे मंत्री, आमदार माजले आहेत. कोण चड्डी-बनियानवर फायटिंग करतोय, कोण सिगारेट ओढतोय, कोण बॅगा दाखवतोय, कोण रमी खेळतोय. शेतकऱ्यांना ज्या परिस्थितीमधून जावे लागते, त्याचं भान ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र यांना कधीही माफ करणार नाही, अशी टीका प्रभू यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठे विधान केले आहे. कोल्हापुरात मीडियाशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत जे सांगितलं ते खरं आहे. महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा घोळ अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत चालू होता. त्यामुळे निवडणुकीकरिता जे वातावरण निर्माण व्हावे लागते ते झालं नाही त्याचा फटका आम्हाला बसला. तसं यापुढे होता कामा नये हे आमच्या सर्वांचे मत आहे. स्वबळाबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यातील शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबून आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती अतिशय गंभीर आणि काळजाला चटका लावणारी असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र सभागृहात "जंगली रमी" खेळण्यात व्यस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अशा असंवेदनशील आणि बेजबाबदार वागणाऱ्या कृषिमंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी पटोलेंनी केली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हिंदीचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी तसे संकेत दिले आहेत. अधिवेशनाआधी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली.
मी बऱ्याच दिवसांनी बोलतोय. ज्यांनी कोणी केली, मग तो बीडच्या मातीतला असेल किंवा बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं आहे की, वैर माझ्याशी होतं, तर माझ्या या मातीची बदनामी का, असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘राज ठाकरेंशी तुमची थेट चर्चा होणार आहे का,’ असा प्रश्न उद्वव ठाकरे यांनी विचारला. त्यावेळी ते म्हणाले, माझं तेच म्हणणं आहे की, आम्ही थेट चर्चा केली तर अडचण काय आहे कोणाला? बोलायला आम्हाला कायच अडचण नाही. मी आता त्याला (राज ठाकरेंना) फोन करून बोलू शकतो. तो मला करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो. बाकीचे लोक एकमेकांना चोरून मारून भेटू शकतात. आम्ही चोरून भेटणाऱ्यांमधील नाही. आम्ही उघडपणे भेटू, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी भाजपवर नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटविले होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, त्या निवडणुकीत पवार यांचा पराभव झाला होत. आता दहा महिन्यांनंतर लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावर पुन्हा भाजपचा बॅनर झळकला आहे.
विधीमंडळाच्या आवारात झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे लोकशाहीचा बुरुज असलेल्या विधीमंडळाची अप्रतिष्ठा झालेली आहे. पण दुर्दैवाने घडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभा अध्यक्षांना कडक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याबाबत कार्यवाही सुरू केलेली दिसत आहे. ते कार्यकर्त्या असलेल्या आमदारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी कायदा हातात घेणे, हे गैर आहे. पण, कायदा योग्य ती पावले उचलेल, याची मला खात्री आहे.
आज तुम्हाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जे चित्र दिसतं. सुमारे १९ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर तेही उद्धव ठाकरेंशी बोलत नव्हते. ते एकमेकांकडे बघत नव्हते, हसत नव्हते. बोलत नव्हते. मात्र पाच जुलै रोजी त्यांनी एकमेकांना अलिंगन दिलं. यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होऊ शकतो. मात्र, त्यासाठी वाट बघावी लागेल, असे विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांमुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज शनि शिंगणापूरमध्ये जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर संकटांची मालिका सुरू होती. मनात इच्छा होती की, शनि शिंगणापूरमध्ये जावं आणि विचारावं का? म्हणून आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार शनि देवाच्या दर्शनासाठी आलो. माझ्याकडून आयुष्यात कधी चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळी देवाचा धावा करणं कधीही योग्य आहे. तसेच, संकटांची मालिका कमी व्हावी, यासाठी शनिदेवाला साकडे घातले, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत बारा टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी महाराष्ट्रातून खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीकांत शिंदे (शिवसेना – शिंदे गट), आणि अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट) उपस्थित राहिले. मात्र, अजित पवार यांच्या गटाकडून एकही खासदार वा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता. नियोजित दौऱ्यांमुळे हजेरी शक्य झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रथम 'संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ जुलै रोजी पंढरपुरात एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा कथित रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांनी विरोधी पक्षांनी चौफेर टार्गेट केले आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोस्ट करत कोकाटेंवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी…अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली आहे.शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्री विधीमंडळात रमी खेळतायत. आमिर खान, शाहरुख खान रमी खेळतो. इतर हिरो रमी खेळतात मग माणिकराव कोकाटे रमी खेळले तर काय? ' या विधानाद्वारे त्यांनी कोकाटे यांच्या कृतीचे समर्थन केले.
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक स्वतंत्र लढायच्या की महाविकास आघाडीत याचा निर्णय स्थानिक पातळीवर करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसने देखील आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ असे आपल्याला सांगितल्याचेही ठाकरे म्हणाले.
सोमवारपासून द्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेसनाच्या आधी आज (रविवारी) 11 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सहपरिवार तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तये तुळजाभवानी मातेची अभिषेक पुजा केली. मंदिराच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात सरनाईक ड्रग्स प्रकरणाची आढावा देखील घेणार असल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, त्यांच्या सहकार मंत्र्यांची लफडी बाहेर येतायेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हा माझा त्यांना कधीकाळचे सहकारी म्हणून सल्ला आहे .टोमणा नाही.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला 21 वर्षीय शिवम चिकणे याला प्रेमसंबंधातून पाच जणांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज आणि ते एकत्र येण्याबाबत विचार व्यक्त केले. ते म्हणाले, राज आणि मी थेट चर्चा केली तर अडचण काय आहे कोणाला. मी आता त्याला फोन करू शकतो. तो फोन मला शकतो. बाकीचे लोक एकमेकांना भेटतात. आम्ही लोकांसारखे चोरून मारून भेटत नाही. ठाकरे आहोत जे करायचे ते उघडपणे करतो. आम्ही एकत्र आलो तर कुणाला प्रोब्लम आहे का? प्रोब्लेम असतील ते बघतील आपण का विचार करायचा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'वसई तालुक्यातील मनपा मधून बाहेर असलेल्या 29 ग्रामपंचायती जिल्हा परिषद पालघरमध्ये समाविष्ट करूनच सुधारित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावी यासाठी काँग्रेसतर्फे निवेदन देत हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या. कांग्रेस नेते विजय गोविंद पाटील व जिमी मतेस गोन्सालवीस याच्या तर्फे २९ ग्रामपंचायती जिल्हापरिषदेत समाविष्ट करण्याचा संदर्भाचा अर्ज आज तहसीलदार यांना सादर करण्यात आला. यावेळी संपूर्ण जिल्हा कांग्रेस कार्यकारणी तहसीलदार कार्यालयात हजर होती.
यवतमाळ महसूल विभागाच्या बैठकीत दिग्रस आणि उमरखेड येथील मंडलधिकाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.दिग्रसचे यु.एच. ठाकरे आणि उमरखेडचे पी.एम माने या दोघांवर निलंबन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.