Pradeep Pendhare
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी 'आई' (AAI) कर्ज योजना सुरू आहे.
या योजनेद्वारे पर्यटन व्यवसायासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
यात मिळणाऱ्या 15 लाखापर्यंतचे बँक कर्जावर 4.5 लाख रुपयांपर्यंतचा व्याजाचा परतावा थेट सरकारकडून दिला जातो. यामुळे कर्ज बिनव्याजी होते.
होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल, कृषी पर्यटन यांसारखे पर्यटनाशी संबंधित ४१ पेक्षा जास्त व्यवसाय यात समाविष्ट आहेत. कर्जाची परतफेड कालावधी साधारणपणे ७ वर्षांपर्यंतचा आहे.
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. व्यवसाय पर्यटनाशी संबंधित आणि महिलेच्या नावावर नोंदणीकृत असावा.
अर्जदार महिला, त्यांचा पर्यटन व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक हे तिन्ही घटक महाराष्ट्र राज्यातच स्थित असावेत.
अधिकृत आई धोरण पोर्टलवर नोंदणी करताना, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र आणि निवास दाखला लागतो.
व्यवसायाचा प्रकल्प अहवाल आणि व्यवसाय नोंदणीचे कागदपत्र. जिल्हा पर्यटन कार्यालय किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येते.
व्यवसायातील एकूण व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांपैकी किमान 50 टक्के कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे.