Amit Ujagare
१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा सुरु होत आहे. भारताची ही १६ वी जनगणनेला सुरुवात होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात स्व-गणना १ ते १५ मे पर्यंत चालणार आहे.
ही जनगणना डिजिटल असून यामध्ये नागरिक आपल्या फोनद्वारे यामध्ये आपली माहिती भरु शकतात. तसंच १ ते १५ मे दरम्यान आपण स्वगणना देखील करु शकतो.
यासाठी se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन आपला फोन क्रमांक टाकून ओटीपी आल्यानंतर हा फॉर्म नागरिकांना अॅक्सेस करता येणार आहे.
सुरुवातीला यामध्ये जिओ लोकेशन द्यावं लागेल, त्यानंतर यामध्ये आपल्या कुटुंबाबत ३३ प्रश्न विचारले जातील.
या प्रश्नांची उत्तर भरल्यानंतर एक SE क्रमांक जनरेट होईल. हा ११ डिजिटचा क्रमांक असेल, यानंतर १५ मेनंतर आपल्या घरी जे जनगणना कर्मचारी येतील, त्यांना हा क्रमांक द्यावा लागेल.
त्यानंतर हे जनगणना कर्मचारी स्वतः तुमची माहितीची पडताळणी करुन जनगणनेच्या डेटाबेसमध्ये ही सर्व माहिती भरणार आहेत.
त्यामुळं या डिजिटल जनगणनेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभाग घ्यावा असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रातिनिधीक स्वरुपात याची माहिती दिली आहे.