Ganesh Sonawane
दुसऱ्या महायुद्धात 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केलं होतं. त्यात चीनची चीनची प्रचंड हानी झाली होती. चीनच्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्यबळ जखमी झालं. चीनमध्ये हाहाकार उडाला होता.
चीन कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारताचा शत्रू राहिला आहे, मात्र त्यावेळी भारत चीनच्या मदतीला धावून गेला होता.
त्यावेळी चीनने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून भारताला पत्र पाठवलं होतं. या पत्रानंतर भारतातून पाच डॉक्टरांची टीम चीनला पाठवण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा देखील समावेश होता.
डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. चीनमध्ये तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.
डॉ. कोटणीस यांनी सलग 72 तास कोणताही ब्रेक न घेता चीनी सैन्यांची ऑपरेशन्स केली. त्यांनी या युद्धामध्ये जखमी झालेल्या तब्बल 800 चीनी सैनिकांचे प्राण वाचवले.
९ डिसेंबर १९४२ मध्ये चीनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. कोटणीस यांना आजही चीनमध्ये देव मानलं जातं. त्यांची पूजा केली जाते.
चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयांना देखील डॉक्टर कोटणीस यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच तिथे काही ठिकाणी त्यांचा पुतळा देखील असल्याचं पाहायला मिळतं.
२०१४ मध्ये जेव्हा शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी दिल्लीत डॉ. कोटनीस यांच्या बहिणीची भेट घेतली होती.
चीन (१९८२ आणि १९९२) आणि भारत (१९९३) या दोन्ही देशांनी टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला आहे.