Roshan More
राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंगळवारी मंजुरी दिली.
या योजनेचा लाभ तब्बल 55.72 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती या योजनेस पात्र नसेल.
सहकारी संस्थांचे 25 हजारहून अधिक वेतन असणारे अधिकारी कर्मचारी देखील या योजनेसाठी अपात्र असतील.
शेतकऱ्यांनी १ एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत कर्जाचे तसेच 31 मार्च 2026 पर्यंत थकीत कर्जाला माफी दिली जाईल.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतर वन टाईम सेटलमेंट म्हून दोन लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार.