Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'राजकीय' योग्यतेविषयी इतिहासकार काय म्हणतात?

सरकारनामा ब्युरो

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज्यांच्या विषयी प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

आपल्या थोड्याश्या कारकीर्दीतही त्यांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केली. याच कारकीर्दीमध्ये महाराजांच्या राजकीय योग्यतेविषयी इतिहासकार काय म्हणायचे ते आपण पाहणार आहोत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

ढिलावलेल्या यंत्रणेसोबत औरंगजेबाशी लढा :

इतिहासकार म. म. पोतदार म्हणतात, छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले त्यावेळी राज्याची यंत्रणा दुहीमुळे ढिलावले होती. अशी ढिलावलेली यंत्रणा घेऊन त्यांनी औरंगजेबाशी टक्कर दिली. याबद्दल त्यांची तारीफच...

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

वडिलांच्या पाऊलावर पाऊल :

शिवाजी महाराजांनी घालून दिलेले दंडक आणि तयार केलेली राजनीती त्यांनी चालूच ठेवली होती. संभाजी महाराज म्हणतात, “आबासाहेबांचे संकल्पित आहे ते आम्हास चालवणे अगत्य"

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

इंग्रजांसोबत झालेल्या एका मैत्री करारात महाराज म्हणतात, "माझ्या वडिलांचा वेळी जो शिरस्ता होता तोच मी पाळीन" गादीवर आल्यानंतर राज्ययंत्रणेवर आपली जरब बसविली. त्यामुळे वतनदार लोक दचकून वागू लागले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

निष्पक्षपाती न्याय :

राज्यकारभाराचे आणि न्याय निवाड्याचे महाराजांचे हजारो कागद उपलब्ध आहेत. त्यावरून दिसते की, ते निष्पक्षपाती न्याय देत होते. मनुष्याची कदर आणि औदार्य हे त्यांचे गुण पुष्कळ ठिकाणी दिसून आलेले आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

लोकांबद्दल आदरभाव :

धर्माच्या क्षेत्रांत, साधुसंत, देवदेवता, विद्वान ब्राह्मण यांच्याविषयी महाराजांनी वडिलांप्रमाणेच आदरभाव ठेवलेला आढळतो.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

बाटून मुसलमान झालेल्या अनेक ब्राह्मणांना शुद्ध करून पुन्हा हिंदूधर्मात घेण्याचे धाडस संभाजी महाराजांनी दाखविलेले दिसते.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

अभिनेत्रीच्या लग्नात आलेले वऱ्हाडी गोत्यात; थेट CBI करणार ‘खातीरदारी’, काय घडलं?

Ranya Rao | Sarkarnama
येथे क्लिक करा