अनुराधा धावडे
केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयचे हीरक महोत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ही देशाची प्राथमिक तपास यंत्रणा आहे.
1 एप्रिल 1963 रोजी एका ठरावाद्वारे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ची स्थापना करण्यात आली.
डी.पी. कोहली सीबीआयचे पहिले संचालक होते.
सीबीआय 1963 पासून 60 वर्षे जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.
देशभरात श्रीनगर ते तिरुवनंतपुरम आणि गांधीनगर ते इटानगरपर्यंत असे 36 शहरांमध्ये सीबीआयच्या कार्यालयांचे जाळे पसरले आहे.
देशाचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी, सीबीआयने बँक फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करून आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सीबीआयकडे गंभीर प्रकरणांचा तपास करणे आणि खटला चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सीबीआयने स्थापनेपासूनच अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करुन देशभरातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरण 1991, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 1993, शारदा चिट फंड घोटाळा 2013, चारा घोटाळा 1996 अशा अनेक प्रकरणांचा सीबीआयने यशस्वी तपास केला.