Rashmi Mane
वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांमुळे यूपीएससीची तयारी अर्ध्यावरच सोडून देणाऱ्या अनेक महिलांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील.
पण अनु कुमारी यांनी यूपीएससी परिक्षा देण्यासाठी दोन वर्षे स्वतःपासून मुलाला दूर ठेवले अन् स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.
त्यामुळेच आयएएस अधिकारी अनु कुमारी यांची कहाणी लाखो विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण आहे.
म्हणूनच अनु कुमारी यांची कहाणी वेगळी आहे. तिने तिच्या मुलाची काळजी घेत नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. 2017 मध्ये अनु कुमारीने दुसऱ्या प्रयत्नात देशात दुसरा क्रमांक मिळवून त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
अनु कुमारी या सोनीपत येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी नागपूरच्या आयएमटी येथून वित्त आणि विपणन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. काही वर्षांनी, २०१२ मध्ये, अनुचे लग्न झाले आणि तिला गुरुग्रामला जावे लागले.
अनु कुमारीने तिच्या यूपीएससीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जवळजवळ दोन वर्षे तिच्या मुलापासून दूर राहण्याचा कठीण निर्णय घेतला. ती पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेला बसली, पण तीची ही संधी फक्त एका मार्कामुळे गेली.
पहिल्यांदाच अपयशी ठरल्यानंतर तिला आयुष्यात निराशेचा सामना करावा लागला पण तिने हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिली. अखेर २०१७ मध्ये ऑल इंडिया रँक २ सह ती आयएएस बनण्यात यशस्वी झाली.