सरकारनामा ब्यूरो
काही धडाकेबाज IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवेत मोलाची कामगिरी केली, तसेच राजकरणात येत राजकीय पदावर महत्त्वाच्या कामे केली. कोण आहेत हे नेते वाचा...
1975 बॅचच्या IAS अधिकारी राज कुमार सिंह हे बिहार केडरच्या केंद्रीय गृहसचिव या पदावर कार्यरत होते. 2013 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्द घडवली.
1974 ला हर्षदीप सिंग पुरी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतून त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. जानेवारी 2014 ला त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. सप्टेंबर 2017 मध्ये ते केंद्रीय मंत्री झाले.
अन्नामलाई कुप्पुसामी हे 2011 ला UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IPS झाले. 25 ऑगस्ट 2020 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शशिकांत सेंथिल हे कर्नाटक केडरचे माजी IAS अधिकारी होते. 2019 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मणिशंकर अय्यर हे 1963 ला भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 1989 ला राजकारणात प्रवेश करायचा असल्याने त्यांनी सर्व सेवेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
1973 ला मीरा कुमार यांनी सार्वजनिक सेवेला सुरुवात केली होती. पण नंतर राजकारण येत 2009 ते 2014 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले.
यशवंत सिन्हा यांची 1960 ला IAS झाले. 1984 पर्यंत त्यांनी प्रशासन सेवेत काम केले. राजकारणात प्रवेश करत जनता दलाचे सदस्य म्हणून 1990-91 दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
1953 ला भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) म्हणून रुजू झाल्यानंतर नटवर सिंग यांनी 31 वर्षे या पदावर काम केले. त्यांनी आठव्या लोकसभेत यशस्वीपणे निवडणूक लढवली.
अल्फोंस कन्ननथनम यांनी IAS अधिकारी म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. भाजपमध्ये प्रवेश करत ते मोदी सरकारचे केरळमधील पहिले मंत्री ठरले.
अजित जोगी हे 1968 च्या बॅचमधून IAS अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेत त्यांनी नोकरी सोडली. 2000 ते 2003 पर्यंत छत्तीसगडचे ते पहिले मुख्यमंत्री होते.