Deepak Kulkarni
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत २५ जून 1975 ला देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती.
तत्कालीन पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी त्या रात्री देशात आणीबाणी लागू करणार्या ड्राफ्टवर सही केली होती.
भारतात १९७५ साली लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळाला रविवारी (दि.२५) ४८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
26 जून 1975 च्या सकाळी जेव्हा देशात आणीबाणीची बातमी पसरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.
26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती.
देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली जात असल्याचे सांगितले होते. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं होतं.
इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती.
राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचं म्हटलं जातं.
इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे.