Rashmi Mane
लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करून IFS अधिकारी बनलेल्या तमाली साहा यांची प्रेरणादायी कहाणी!
UPSC ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा आहे. यातून IAS, IPS, आणि IFS अधिकारी निवडले जातात. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करतात.
तमाली साहा पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण गावातूनच पूर्ण केलं आणि नेहमीच शिक्षणात अव्वल होत्या.
प्राणीशास्त्रात पदवी मिळवण्यासाठी त्यांनी कोलकाता विद्यापीठात प्रवेश घेतला. याच काळात त्यांना UPSC देण्याचा विचार आला.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. करंट अफेअर्स, सामान्य अध्ययन आणि पर्यावरण शास्त्रावर त्यांनी भर दिला.
2020 मध्ये, पदवी पूर्ण केल्यानंतर, तमालीने UPSC IFS परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली!
तमाली साहा यांनी AIR 94 मिळवून IFS मध्ये स्थान पटकावलं. हे यश मिळवताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
IFS अधिकारी म्हणून त्यांना पश्चिम बंगाल कॅडर मिळाला. आज त्या वनसेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.