सरकारनामा ब्यूरो
आंध्र प्रदेशचे संपूर्ण राजकारण ज्या एका व्यक्तीभोवती फिरते ते वायएस जगनमोहन रेड्डी, यांचा आज वाढदिवस.
जगनमोहन रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील जमलामादुगु येथे झाला.
सप्टेंबर 2009 मध्ये माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर जगनमोहन यांनी त्यांच्या वडिलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या जागेवर काँग्रेस पक्षात दावा केला.
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष आणि खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून 'वायएसआर काँग्रेस पार्टी ' या पक्षाची स्थापना केली.
वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत.
वडिलांप्रमाणेच ‘प्रजा संकल्प पदयात्रे’च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत पक्षाची पायाभरणी करण्यात रेड्डी यांना यश आले आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय यशात त्यांची पत्नी वाय एस भारती रेड्डी यांची साथ मिळाली आहे.
वाय एस भारती रेड्डी या जगनमोहन यांच्या हैदराबादमधील भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि साक्षी मीडिया समूहाच्या अध्यक्ष आहेत.
रेड्डी यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.
पक्षबांधणीसाठी १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा, संघर्षाच्या जोरावर आज ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत.