Rashmi Mane
भारताची अशी एक ट्रेन जी तुम्हाला 15 दिवसांत देशदर्शन करून आणते. ऐकून थक्क झालात ना?
IRCTC द्वारे चालवली जाणारी ही विशेष ट्रेन, भारतातील महत्त्वाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडते.
होय! ही ट्रेन वर्षातून केवळ एकदाच उपलब्ध असते. त्यामुळे यामध्ये प्रवास करणे म्हणजे सुवर्णसंधीच! ही ट्रेन वर्षातून फक्त 15 दिवस धावते. या ट्रेनमध्ये एका वेळी फक्त 500 लोकांना प्रवास करण्याची परवानगी आहे.
ही ट्रेन 15 दिवसांत 8000 किमी प्रवास करते. या ट्रेनचा प्रवास मुंबईपासून सुरू होतो. ही ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान 12 राज्यांमधून जाते.
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि भारताच्या कानाकोपऱ्याला भेट द्यायची असेल. ही ट्रेन 2008 पासून धावत आहे, पण या ट्रेनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
खाण्याची व्यवस्था, शौचालय, टूर गाईड, एसी कोचेस — सर्व काही दिलं जातं एका पॅकेजमध्ये.
ही यात्रा दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होते, परंतु त्याची नोंदणी 15 ऑक्टोबरपासूनच सुरू होते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. नोंदणीसाठी तुम्ही https://www.jagritiyatra.com/ या लिंकला भेट देऊ शकता.