Rashmi Mane
'अन्ना राजम मल्होत्रा' भारताच्या पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी होत्या.
मल्होत्रा यांचा जन्म केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात 7 जुलै 1924 ला झाला होता.
अन्ना यांनी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले होते.
1951 मध्ये त्या 27 वर्षांच्या असताना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रुजू झाल्या.
'अन्ना राजम मल्होत्रा' यांची 1951 मध्ये मद्रास राज्यात 'नागरी सेवक' म्हणून नियुक्ती झाली होती.
स्वतंत्र भारताच्या पहिला महिला सनदी अधिकारी अन्ना राजम मल्होत्रा यांनी 2018 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.