Akshay Sabale
देशात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुका होत असतात. कोणतीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना आयोगाकडे डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम जमा करावी लागते.
निवडणुकीत एकूण मतांच्या सुमारे 16.66 (1/6) टक्क्यांपेक्षा कमी मते पडल्यास डिपॉझिट जप्त होते.
पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून 2019 च्या लोकसभेपर्यंत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांचा आकडा थक्क करणारा आहे.
1951 ते 2019 दरम्यान 91 हजार 160 उमेदवारांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं आहे. मात्र, तब्बल 71 हजार 246 जणांना आपलं डिपॉझिट वाचवता आलं नाही.
देशात पहिली लोकसभा निवडणूक 1951-52 मध्ये झाली. तेव्हा, 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील 745 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 436 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यातील 51 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
काँग्रेसचे 421 उमेदवारांनी नशिब आजमावलं होतं. त्यातील तब्बल 148 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेले.
बहुजन समाजवादी पक्षाच्या 345 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या 49 पैकी 41 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.
R