सरकारनामा ब्यूरो
मणिशंकर अय्यर यांचा जन्म १० एप्रिल १९४१ रोजी लाहोर येथे झाला.
भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
अय्यर हे १९९१, १९९९,२००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
त्यांनी २००४ ते २००९ दरम्यान मनमोहन सिंग सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री,पंचायती राजमंत्री आणि क्रीडामंत्री म्हणून काम पाहिलं.
अय्यर हे त्यांच्या सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे कायमच विरोधकांसह काँग्रेस पक्षाच्या निशाण्यावर राहिले.
2004 साली तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यावर वीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मणिशंकर अय्यर हे चांगलेच चर्चेत आले होते.
2017 साली त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टीदेखील करण्यात आली होती. दरम्यान, 9 महिन्यांनंतर त्यांचं निलंबन मागेही घेण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीतही मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘चायवाला’ असे हिणवत ते एक नीच प्रकारचा माणूस आहे असे वादग्रस्त वक्तव्य अय्यर यांनी गुजरात निवडणुकीदरम्यान केले होते.