Rashmi Mane
‘श्यामची आई’ ही आत्मकथा केवळ एक पुस्तक नव्हे, तर ती आहे संस्कारांची गीता…
साने गुरुजींच्या लेखणीतून साकारलेली ही कहाणी आजही मनाला स्पर्श करते.
11 जून 2025 रोजी साने गुरुजींच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा एकदा त्यांची आठवण जागी झाली. साहित्य, विचार, आणि संवेदनशीलतेचं प्रतीक!
9 ते 13 फेब्रुवारी 1933 – केवळ पाच दिवसांत लिहिलं गेलं ‘श्यामची आई’!
स्थान – नाशिक रोडचं मध्यवर्ती कारागृहातील एक साधा तुरुंग कक्ष…
साने गुरुजी ज्या खोलीत कैदेत होते, ती खोली आता स्मारक झाली आहे.
बंदीवानांसाठी ती खोली आता विचारांचं व संस्कारांचं मंदिर आहे.
“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” – साने गुरुजींची ही प्रार्थना
आजही त्या वास्तूत दररोज घुमते… बंदीजनांच्या मनात थेट पोहोचते.
साने गुरुजी केवळ साहित्यिक नव्हते, तर एक ज्वलंत समाजसुधारक होते.
त्यांचं प्रत्येक लिखाण ही विचारांची क्रांती होती.
‘श्यामची आई’ ही कथा म्हणजे भारतातल्या प्रत्येक मातेसाठी एक अभिवादन आहे.
प्रेम, शिस्त आणि त्यागाचा अमर आदर्श.
बंदीजनही समाजाचाच भाग हे साने गुरुजी शिकवून गेले. त्यांच्या स्मृतीस्थळी आजही तेच संस्कार रुजवले जातात.