सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (3 जानेवारी) राजस्थानमधील राजभवन येथे बांधण्यात आलेल्या संविधान उद्यानाचे लोकापर्ण केले.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रपतींसोबत उपस्थित होते.
संविधान उद्यानात देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका असलेले महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.
आपली राज्यघटना आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींची माहिती व्हावी यासाठी संविधान उद्यान बांधण्यात आले.
संविधान पार्क अशी कलाकृती आहे, जी पाहून कोणीही थक्क होईल.
पहिल्या संविधान पार्कमध्ये भारतीय राज्यघटनेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सदस्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.
भारताचे राष्ट्रीय चिन्ह असणारे अशोक स्तंभ हे देशाच्या संस्कृतीचे आणि स्वतंत्र अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक आहे.
या पार्कमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चर्चा करतानांचा पुतळा आहे.
संविधान लिहिणाऱ्या सदस्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
त्याग, शौर्य आणि जिद्द यासाठी इतिहासात अजरामर असणाऱ्या महाराणा प्रताप यांचा भाला धारण, चेतक घोडा असलेला पुतळाही येथे बसवण्यात आला आहे.