अनुराधा धावडे
वादग्रस्त धर्मगुरु नित्यानंद हे देशातील सर्वात श्रीमंत बाबांपैकी एक आहेत. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, नित्यानंद यांच्याकडे एकूण 10 हजार कोटींची संपत्ती आहे.
आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहेत. आसाराम ट्रस्टची एकूण उलाढाल 350 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर आसाराम बापू एकूण 134 दशलक्ष डॉलर्सचे मालक आहेत.
योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली आहे. बाबा रामदेव सोळाशे कोटी रुपयांचे मालक आहेत.
श्री-श्री रविशंकर हे देशातील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक आहेत. त्यांच्याकडे विविध आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन केले जाते. श्री-श्री रविशंकर यांच्याकडे एक हजार कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती आहे.
देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृतानंदमयी यांचा समावेश होतो. माता अमृतानंदमयी या केरळच्या असून त्यांच्याकडे एकूण पंधराशे कोटी रुपयांची संपत्ती आहे.
ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव हे देखील करोडोंचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.