Amit Ujagare
यंदा होळीनिमित्त प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेनं नवी रणनीती आखली आहे.
तिकीट विक्री, रेल्वेचे मार्ग निश्चित करणे आणि स्टेशनवर गर्दीच्या नियंत्रणासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच (AI) सहकार्य घेतलं जाणार आहे.
रेल्वेचा दावा आहे की, या AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रवाशांना लांब रांगा आणि वेटिंगपासून दिलासा मिळणार आहे.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं की, कोणत्याही रेल्वे स्थानकात असुविधेची स्थिती निर्माण होता कामा नये. यासाठी AI च्या माध्यमातून रिअल टाइम विश्लेषण केलं जात आहे.
तसंच गरज पडल्यास केवळ अर्ध्या तासात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल.
होळीच्या सणानिमित्त नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर यंदा विशेष होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे, इथं हायरिझोल्युशन कॅमेरे लावण्यात आले आहेत. जे अनारक्षित प्रवाशांच्या संख्येचं सातत्यानं विश्लेषण करत आहेत.
या कॅमेऱ्यांतून मिळणाऱ्या डेटाच्या आधारवार AI सिस्टिम गर्दीचं रिअल टाइम विश्लेषण करते, याद्वारेच गाड्यांची संख्या, वेळ आणि व्यवस्थापनाची योजना निश्चित केली जाते. यामुळं अचानक वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता यावं.
दिल्ली स्टेशनवर तिकीट विक्रीचा पूर्ण डेटा थेट AI सिस्टिमला पाठवला जातो त्यानुसार ज्या मार्गासाठी सर्वाधिक अनारक्षित तिकीट विक्री होत आहे. त्याच बाजुला गाड्यांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढवली जात आहे.
म्हणजेच आता रेल्वे गाड्या या निश्चित वेळेनुसार न सोडता प्रवाशांची मागणी आणि गर्दीच्या आकडेवारीच्या आधारावर सोडल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत जिथं लोकल गाड्यांसाठी तुफान गर्दी असते तिथं राबवला जाऊ शकतो.