Rashmi Mane
नवी दिल्ली येथे होणारी G-20 शिखर परिषदेसाठी नुकत्याच बांधण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये G-20 परिषद पार पडत आहे.
भारत मंडपम हे अनेक तंत्रज्ञानाने भव्य बनवण्यात आले आहे. बघूया कसा आहे भारत मंडपम?
G-20 शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रम भारत मंडपममध्येच आयोजित केले गेले आहेत. G-20 साठी भारत मंडप सुंदरपणे सजवला गेला आहे.
ITPO मध्ये बांधलेले हे नवीन कॉम्प्लेक्स जगातील टॉप 10 कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक आहे, जे जर्मनीतील हॅनोव्हर आणि चीनमधील शांघाय यांसारख्या प्रसिद्ध कन्व्हेन्शन सेंटरशी स्पर्धा करते.
भारत मंडपम 123 एकरांवर बांधला गेला आणि त्याच्या बांधकामावर सुमारे 2700 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
देशातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 10,000 लोक बसण्याची क्षमता आहे. ही इमारत तीन मजल्यांची आहे.
यात इमारतीमध्ये मोठे हॉल, अॅम्फी थिएटर, अनेक बैठक खोल्या आहेत. हे सेंटर किती भव्य आहे याचा अंदाज तुम्ही या फोटोवरून लावू शकता.
या सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह अनेक 'व्हीआयपी लाउंज' आणि 'कॉन्फरन्स रूम' देखील आहेत.
भारत मंडपमच्या तिसऱ्या मजल्यावर एकाच वेळी सात हजार लोक बसू शकतील आणि थिएटरमध्ये एकाच वेळी तीन हजार लोक बसू शकतील. तंत्रज्ञानासोबतच 'व्हीआयपीं'च्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.