मुंबईसह MMR मधील 9 महापालिकांमध्ये कोणाची येणार सत्ता? Exit Poll काय सांगतो?

Amit Ujagare

मुंबई महानगर प्रदेश या ६,३२८ किमी चौरस किमी भागातील एकूण ९ महापालिकांमध्ये गुरुवारी मतदान पार पडलं. यानंतर लगेचच एक्झिट पोल्सही जाहीर झाले, साम टीव्हीनं घेतलेल्या एक्झिट पोल्समध्ये कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार? याचे अंदाज पाहुयात.

BMC

बृहन्मुंबई

मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे. तसंच शिवसेना-भाजपला इथं स्पष्ट बहुमतही मिळण्याची शक्यता आहे.

BMC Exit Poll

ठाणे

ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून ठाकरे सेना आणि मनसेचा दारुण पराभवाचा अंदाज आहे.

Thane Exit Poll

कल्याण-डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता असून भाजप दुसरा मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे.

Kalyan Dombivali Exit Poll

उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.

Ulhasnagar Exit Poll

भिवंडी-निझामपूर

भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पार्टी हा दुसऱ्या स्थानी राहील असा अंदाज आहे.

Bhiwandi Exit Poll

वसई-विरार

वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष राहील असा अंदाज असून दुसरा सर्वात मोठा पक्ष भाजप राहील.

Vasai-Virar Exit Poll

मिरा-भायंदर

मिरा-भायंदरमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहू शकतो तर शिंदेसेना हा दुसरा पक्ष राहू शकतो.

Mira-Bhaindar Exit Poll

नवी मुंबई

नवी मुंबईत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून शिंदे सेना दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल.

Navi Mumbai Exit Poll

पनवेल

पनवेलमध्ये तर भाजप क्लीनस्विप देईल असा अंदाज आहे. एकटा भाजप इथं बहुमताचा आकडा गाठू शकतो.

Panvel Exit Poll