Rashmi Mane
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन सरकारने मागे घेतले आहे.
त्यामुळे परमबीर सिंह पुन्हा चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे परमबीर सिंह यांना राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
महाविकास आघाडी सरकारने त्यांच निलंबन केलं होतं.
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) यांच्या आदेशानेच सिंह यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावर झालेली निलंबन मागे घेण्यात आले आहे.
CAT च्या आदेशानुसार परमबीर सिंह यांची निलंबन कालावधीतील सेवा कायम धरण्यात येणार आहे.
अँटेलिया स्फोटक आणि हिरेन प्रकरण, अग्रवाल खंडणी प्रकरण, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, फसवणूक इत्यादी प्रकरणात निलंबन केलं गेलं होत.
परमबीर सिंह यांचं निलंबन अखेर शिंदे फडणवीस यांनी मागे घेतलं आहे.