सरकारनामा ब्यूरो
दावोस येथे झालेल्या दोन दिवसीय जागतिक आर्थिक परिषदेत (world Economic Forum) महाराष्ट्रातील विविध उद्योगांच्या गुंतवणुकींसाठी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत.
दावोसमध्ये झालेले सामंजस्य करारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय काय आणलं?
विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत.
गडचिरोली येथील वरद फेरो ऑलाँइज या ब्रिटन कंपनीने स्टील प्रकल्पासाठी १ हजार ५२० कोटी गुंतणूक करण्याचा करार केला आहे. त्यातून २ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी गुंतवणूकीचा करार झाला आहे.
औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, या मुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळणार आहे.
पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे.