
Beed : नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने देशात अभूतपूर्व विकास कामे केली आहेत.आपल्या बीड जिल्ह्याला देखील केंद्राच्या माध्यमातून `न भूतो' असा विकासनिधी मिळाला, असा दावा खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी केला आहे. (Pritam Munde News) मोदी सरकारला नऊ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त संपर्क मोहिमे अंतर्गत प्रितम मुंडे यांनी काल धारूर तालुक्यात नागरीकांच्या भेटीगाठी घेतल्या.
धारूर तालुक्यात अनेक विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नऊ वर्षाच्या सुशासनात झालेल्या विविध विकास कामांची आणि योजनांची माहिती देतांना प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी मोदींना समर्थन देण्यासाठी धारूरच्या नागरिकांना आवाहन केले. या अभियानात लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
तत्पुर्वी योगदिना निमित्त परळीत आयोजित योग शिबिरात डाॅ. मुंडे सहभागी झाल्या होत्या. (Beed News) दैनंदिन योगाभ्यासापेक्षा आजचे योगकर्म विशेष होते, कारण परळी शहरातील असंख्य महिला,तरुणी आणि विविध क्षेत्रातील माझ्या कर्तृत्वान भगिनी माझ्यासोबत सहभागी होत्या, असेही त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्या निमित्त राज्यभरात संपर्क अभियान राबविले जात आहे. विरोधकांकडून बीड जिल्ह्याचा विकास रखडल्याची टीका केली जाते. या संपर्क मोहिमेच्या माध्यमातून खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र बीड जिल्ह्याला आतापर्यंत मिळाला नाही, एवढा निधी मोदी सरकारच्या काळात मिळाल्याचा दावा केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.