
भोपाळ : कमलनाथ आणि दिग्वीजयसिंह यांनी माझ्यासहत मध्यप्रदेशातील साडेसात कोटी जनतेच्या पाठित खंजीर खूपसला आहे. कमलनाथांच्या पंधरा महिन्याच्या कारभाराला जनता कंटाळले होते असा घणाघात भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.
शिंदे यांना कॉंग्रेसचा त्याग करून सात महिने झाले. या सात महिन्यात त्यांनी कॉंग्रेसला अनेकवेळा लक्ष्य केले आहे. ते कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या समर्थक 22 आमदारांनीही पक्षाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर बऱ्यात घडामोडी घडल्या आणि पुन्हा शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनले आहे. राज्यात पोटनिवडणूक होत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवाराबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांने कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. तर शिंदे यांच्या सारखे नेते आपल्या सर्व समर्थक आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कमलनाथ आणि दिग्वीजय यांनी ज्योतीरादित्यांवर टीका करताना त्यांना गद्दार म्हटले आहे. त्याचा समाचार आता शिंदे यांनी घेतला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांवरही टीका केली.
राज्यातील सध्याच्या कॉंग्रेसच्या स्थितीवर मला काही बोलायचे नाही. पण, ग्वाल्हेर आणि चंबळ विभागात कॉंग्रेसला गेल्या वेळी मोठे यश मिळाले होते. या विभागामुळेच कमलनाथ मुख्यमंत्री बनले होते याचा विसर त्यांना आज पडला आहे. या विभागातील एकून 34 जागांपैकी 26 जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले होते.
आपण कमलनाथांना विरोध केला पण, चौहानांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, की मुळात मला मुख्यमंत्री केले नाही म्हणून मी नाराज नव्हतो. उलट कमलनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर मला आनंदच झाला होता. ते मुख्यमंत्री बनल्यानंतर वल्लभ भवन रात्रंदिवस बंदच राहिले.
सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. नाराजी वाढत होती. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी एकाही जिल्ह्याचा दौरा केला नाही. गळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. विकासासाठी काही प्रयत्न होत नव्हते हे चित्र पाहिल्यानंतर मी स्वस्थ बसणे शक्य नव्हते. शेवटी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय मी घेतला.
भूतकाळ, भूचकाळच असतो !
राहुल गांधींनी म्हटले आहे, की ज्योतिरादित्य असे ऐकमेव नेते होते, की ते केव्हाही माझ्या घरात येऊ शकत होते याकडे लक्ष वेधले असता ज्योतिरादित्य म्हणाले, की मला आता भूतकाळात डोकावयाचे नाही. भूतकाळ हा भूतकाळच असतो. गेल्या सात महिन्यापासून मी या मुद्यावर शांत आहे. काही गोष्टी सकारात्मक घ्यावा लागतात. मी आता वर्तमान आणि भविष्य काळावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. भूतकाळावर कोणतेही भाष्य मी करणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.