Pradeep Pendhare
शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट ऑफ इंडिया' म्हणू या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर माफी मागताना मग्रुरी होती.
मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे.
राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू
महाराष्ट्रासह भारताच्या बाहेरही लोक संतप्त झालेत. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडणार नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
आमचं आंदोलन शिवरायांच्या सन्मानासाठी आहे. शिवरायांच्या आत्मसन्मानासाठी रस्त्यावर उतरलेल्यांविरोधात भाजप आंदोलन करते आहे.
महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात. पण राज्यातील जनता संयमी आहे.
नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल 'डिस्कव्हरी ऑफ इंडियात' जे लिहिलंय त्याबद्दल ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का?
पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला. यात राजकारण होऊ नये, याची सरकार जर चौकशी केली पाहिजे.