Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, डोळे पाणावले...

Roshan More

मराठवाड्यात अवकाळी

मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Aaditya Thackeray | sarkarnama

आदित्य ठाकरे मराठवाड्यात

पावसाने झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

Aaditya Thackeray | sarkarnama

शेतकऱ्यांच्या बांधावर

पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतीच्या बांधावर जाऊन आदित्य यांनी अवकाळी भागाची पाहणी केली. अवकाळीने झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.

Aaditya Thackeray | sarkarnama

सरकारला आवाहन

अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पीकं पाण्याखाली गेली असताना बळीराजा हवालदिल झालाय. बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका.तातडीने मदत द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी सरकारला केले.

Aaditya Thackeray | sarkarnama

शेतकऱ्यांना धीर

पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

Aaditya Thackeray | sarkarnama

वाऱ्यावर सोडणार नाही

संकट कोणतंही असो, आम्ही बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

Aaditya Thackeray | sarkarnama

नुकसानाची पाहणी

मानवत तालुक्यातील वझुर व रामेटेकळी ह्या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली.

Aaditya Thackeray | Sarkarnama

अंबादास दानवे

आदित्य ठाकरेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते.

ambadas danve | sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा किती महत्त्वाचा?

Narendra Modi at Brunei Darussalam | sarkarnama
येथे क्लिक करा