32 वर्षांनंतर मराठवाडा पुन्हा कोलमडला...सप्टेंबर महिनाच उठला मुळावर

Amit Ujagare

मुसळधार

मऱाठवाड्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या पट्ट्यात पावसानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

Marathwada Floods

पिकं वाहून गेली

या पुरामुळं शेतातील उभी पिकं तर वाहून गेलीच आहेत, त्याचबरोबर शेतातली सुपीक माती ही वाहून गेली आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत, गुरढोरंही वाहून गेली आहेत.

Marathwada Floods

ओला दुष्काळ

या संपूर्ण परिस्थितीमुळं मराठवाडा ओला दुष्काळानं होरपळून निघाला आहे. पण तुम्हाला माहितीए का अशीच भीषण परिस्थिती मराठवाड्यानं ३२ वर्षांपूर्वी पाहिली होती.

Marathwada Earthquake

किल्लारीत भूकंप

30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावात केंद्र असलेला ६.०४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी हे भूकंपाचे तीव्र झटके बसले होते.

Marathwada Earthquake

५२ गावांना फटका

हा भूकंप इतका भीषण होता की, त्यात ५२ गावांमधील ३० हजार घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.

Marathwada Earthquake

१३ जिल्ह्यांना फटका

१३ जिल्ह्यांतील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.

Marathwada Earthquake

१०,००० मृत्यू

या भीषण भूकंपात ९,७४८ माणसं मृत्यूमुखी पडली होती. तर १५,८५४ जनावरं दगावली होती. तसंच ३०,००० लोक जखमी झाले होते.

Marathwada Earthquake

शरद पवारांचं कार्य

हा भूकंप झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. शरद पवारांनी भूकंपानंतर पुढील दहा दिवस लातूरमध्येच मुक्काम ठोकला होता, तिथूनच त्यांनी संपूर्ण प्रशासन कामाला लावलं होतं.

Marathwada Earthquake

आपत्ती व्यवस्थापन प्रणाली

त्यानंतर भूकंपाच्या क्षेत्राचं पुनर्वसन केलं होतं. या भीषण भूकंपनानंतरच देशात आणि महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उभी राहिली.

Marathwada Earthquake
Narendra Modi | sarkarnama
नवरात्रीत 9 दिवस उपवास करणाऱ्या PM मोदींचा दिनक्रम, डाएट कसा असतो?