Roshan More
भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी आज (बुधवार) शपथ दिली.
अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरातील शाळेतून प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले. तर, पुढील शिक्षण मुंबईतील होलिक्रोस स्कूलमधून घेतली.
मुंबईमध्ये पदवी शिक्षण घेत असताना भूषण गवई यांचे वडील आमदार होते. मात्र, तरीदेखील ते आपला साधेपणा जपत बसने प्रवास करून महाविद्यालयातमध्ये जात असत.
भूषण गवई यांच्या आई कमलताई यांनी सांगितले की भूषण यांना शेतीची विशेष आवड होती.
कमलाताई यांनी सांगितलेल्या आठवणी प्रमाणे भूषण गवई यांनी मुंबईतून वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर अमरावतील आले. त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी दोन ते तीन वर्ष शेती केली.
शेती केल्यानंतर त्यांनी तीन ते चार वर्षांनी त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अमरावतीच्या डाॅ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे