Sunil Balasaheb Dhumal
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चाकण येथे सांगता सभा पार पडली.
चाकण येथील सभा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
जोरदार पाऊस पडत असूनही अजितदादांनी व्यासपीठ सोडले नाही. ते तेथेच खुर्चीवर बसून राहिले.
या सभेला शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी गर्दी केली होती.
या सभेत बोलताना अजित पवारांनी विरोधी उमेदवार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.
पाच वर्षांपूर्वी अमोल कोल्हेंना निवडून आणले ही मोठी चूक होती. ती चूक सुधारा असे आवाहन अजित पवारांनी केले.
शिवाजीराव आढळराव पाटलांना मतदान करून केंद्र सरकारमध्ये महायुतीची ताकद वाढवा, असेही ते म्हणाले.
अजितदादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा, बिबट्याचा, शेतीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.