Mayur Ratnaparkhe
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ वरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले विचार मांडले.
ते म्हणाले की, हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे आणि वक्फ बोर्डाला बळकटी देण्यासाठी आणण्यात आले आहे.
अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्ष मुस्लिमांच्या मतपेढीचे राजकारण करत असल्याने या विधेयकाला विरोध करत आहेत.
अमित शहा म्हणाले की, मी या सभागृहाद्वारे देशातील मुस्लिमांना सांगू इच्छितो की वक्फमध्ये एकही गैर-मुस्लिम येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही.
पण वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिल काय करतील? वक्फ मालमत्ता विकणाऱ्यांना पकडून बाहेर फेकले जाईल.
अल्पसंख्याकांसाठी विकास करायचा आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचे आहे.
वक्फ बोर्ड आणि कौन्सिल चोरीला जाणारा पैसा पकडण्यासाठी काम करतील.
अमित शहांनी त्यांनी असेही स्पष्ट केले की आपण येथे संसदेत यासाठी बसलो आहोत आणि हा कायदा आणण्याचा उद्देश देशातील गरीब मुस्लिमांच्या पैशाचे रक्षण करणे आहे.
अमित शहा म्हणाले की, वक्फ बोर्डाने महाराष्ट्रातील एका गावातील महादेवाच्या मंदिरांवर आपला हक्क सांगितला आहे.