Amit Shah on Waqf Board Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर अमित शहांनी संसदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे!

Mayur Ratnaparkhe

विचार मांडले -

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ वरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले विचार मांडले.

विधेयक मुस्लिमांच्या हिताचे -

ते म्हणाले की, हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे आणि वक्फ बोर्डाला बळकटी देण्यासाठी आणण्यात आले आहे.

मुस्लिमांच्या मतपेढीचे राजकारण -

अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्ष मुस्लिमांच्या मतपेढीचे राजकारण करत असल्याने या विधेयकाला विरोध करत आहेत.

एकही गैर-मुस्लिम येणार नाही -

अमित शहा म्हणाले की, मी या सभागृहाद्वारे देशातील मुस्लिमांना सांगू इच्छितो की वक्फमध्ये एकही गैर-मुस्लिम येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही.

त्यांना बाहेर फेकले जाईल -

पण वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिल काय करतील? वक्फ मालमत्ता विकणाऱ्यांना पकडून बाहेर फेकले जाईल.

अल्पसंख्याकांचा विकास -

अल्पसंख्याकांसाठी विकास करायचा आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचे आहे.

नेमकं काय काम करणार? -

वक्फ बोर्ड आणि कौन्सिल चोरीला जाणारा पैसा पकडण्यासाठी काम करतील.

उद्देश काय आहे? -

अमित शहांनी त्यांनी असेही स्पष्ट केले की आपण येथे संसदेत यासाठी बसलो आहोत आणि हा कायदा आणण्याचा उद्देश देशातील गरीब मुस्लिमांच्या पैशाचे रक्षण करणे आहे.

अमित शहा म्हणाले की, वक्फ बोर्डाने महाराष्ट्रातील एका गावातील महादेवाच्या मंदिरांवर आपला हक्क सांगितला आहे.

Next : दंबग पोलिस अधिकारी शिवदीप लांडे नंतर आणखी एका आयपीएस अधिकारीचा राजीनामा

IPS officers resigning in Bihar | Sarkarnama
येथे पाहा