Aslam Shanedivan
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 तारखेला मतमोजणी होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्या प्रचार सभांचे आयोजन झाले होते.
मात्र याचदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामतीत झाला. त्यांच्या आज येथे चार प्रचार सभा होणार होत्या.
गोजुबावी इथं विमान उतरत असतानाच अपघात झाला अन् त्यांचे अकाली मृत्यू झाले. यानंतर आता विमान अपघाताची नेमकी काय काय कारणं असतात याचा शोध घेतला जात आहे.
विमानाच्या अपघाताचं महत्त्वाचं कारण तांत्रिक बिघाड असून नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये गडबड किंवा लँडिंग गिअर किंवा पंखांमध्ये समस्यासह वैमानिक आणि कंट्रोल रूम यांच्यातील संपर्क तुटल्यानेही अपघात होऊ शकतो.
अनेकदा मानवी चुकांमुळेही मोठी दुर्घटना होते. ज्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील (ATC) चुकीचा निर्णय वैमानिकाच्या अनुभवाची कमतरतेसह चुकीच्या निर्णयामुळेही विमान अपघातग्रस्त होतं.
तांत्रिक कर्मचाऱ्याच्या छोट्या चुका जसं की विमानात इंधन योग्य प्रमाणात भरलं न जाणं, टायरच्या दाबावर योग्य लक्ष न ठेवणं इत्यादी.
अचानक हवामात बदल जसे, वादळ, वीज कोसळणं, मुसळधार पाऊस किंवा खराब हवामानामुळे विमान अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त होऊ शकतं.