Rashmi Mane
आजही बहुतेक तरुणांचे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे असते. त्यासाठी प्रचंड मेहनत करतात.
पण भारतात अशी एक शाळा आहे ज्या शाळेमधून आतापर्यंत अनेक विद्यार्थी सैनिक बनून देशाची सेवा करत आहेत. त्यामुळेच या स्कूलला "आर्मीची फॅक्टरी" असं म्हटलं जातं.
या शाळेला आर्मीची फॅक्टरी म्हणणे चुकीचे ठरणार नाही कारण दरवर्षी येथून अनेक मुले सैन्यात निवडली जातात.
या शाळेचे नाव नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) आहे जे भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण कमांडद्वारे चालवले जाते.
RIMC एनडीएसाठी फीडर म्हणून काम करते आणि येथील बहुतेक विद्यार्थी एनडीएमध्ये निवडले जातात.
तसं तर भारतात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ही देशातील सर्वोच्च मिलिटरी स्कूल आहे. पण देशभरात बेंगळुरू, बेळगाव, धोलपूर, अजमेर आणि चौल येथे देखील 5 राष्ट्रीय लष्करी शाळा आहेत.
नॅशनल मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या शाळेत फक्त सहावी, नववी आणि अकरावीच्या वर्गात प्रवेश दिला जातो.