Deepak Kulkarni
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील एका निकाल प्रचंड चर्चेचा विषय ठरला. या प्रभागातून 'एमआयएम'ची सहर शेख नावाची तरुणी निवडून आली आहे.
मुंब्रा येथील सहरचे वडील युनूस शेख व आमदार जितेंद्र आव्हाडांमध्ये टोकाचा वाद आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी मुलगी सहरसाठी उमेदवारी मागितली होती. पण राष्ट्रवादीनं ती नाकारल्यामुळे अखेर तिने एमआयएमच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली होती.
मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखने जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही डिवचलं होतं.
सहर शेखनं एमआयएमच्या तिकीटावर विजय खेचून आणत ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून धडाक्यात एन्ट्री घेतली होती.
'एमआयएम'ला या महापालिका निवडणुकीत आता सहर शेखच्या रुपानं एक आक्रमक तरुण महिला चेहरा मिळाल्याची चर्चा आहे.
राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये एमआयएम पक्षानं तब्बल 125 जागा जिंकत जबरदस्त कामगिरी केली आहे.त्यात ठाण्यातील प्रभाग क्रमांक 30 मधील सहर शेखचा निकालाची जोरदार चर्चा झाली.
सहर शेख या तरुण नवनिर्वाचित महिला नगरसेवकानं केलेलं विजयानंतरचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर विरोध आणि समर्थनाच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
सहर शेखने पहिल्याच विजयी सभेत आपला आक्रमकपणा दाखवल्यानंतर तिला ठाणे महापालिकेतही एमआयएमचा मुख्य आवाज बनण्याची मोठी संधी आहे.