Pradeep Pendhare
दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर आक्रमक राहुल गांधी अन् काँग्रेसमुळे सत्ताधारी भाजपची कोंडी सापडला आहे.
संसदेत येत नसलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यायला तयार होताच, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण यांनी, “पळू नका, लपून बसू नका; चर्चेला आणि वस्तुस्थितीला सामोरे जा”, असा टोला लगावला आहे.
काँग्रेसने यावर ‘कुचू आणि पुचू’ एवढे दिवस राहुल गांधी यांना घाबरून संसदेत येत नाही, अशी टीका केली.
अशोक चव्हाण एकेकाळी काँग्रेसचे नेते राहिले आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसनेच संधी दिली होती.
भाजप राहुल गांधींवर टीका करताना, आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांकडून लक्ष्य करण्याची रणनीती आखल्याचे दिसते.
अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील अनुभवी नेते होते, अन् त्यांच्याकडूनच राहुल गांधींनी टार्गेट केले जात असल्याने काँग्रेस अस्वस्थ होते.
अशोक चव्हाण यांच्या टीकेला प्रतिवाद करताना, काँग्रेस आक्रमक होत प्रत्युत्तर द्यावे लागते आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसला भाजप पुढील काळात अशाच पद्धतीने टार्गेट करत राजकीय फायदा करून घेणार असल्याचा अंदाज आहे.