Ganesh Sonawane
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
अशोक मामा यांनी २५० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे.
वजीर, बिनकामाचा नवरा या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकीय भूमिका केली आहे. या चित्रपटांमधील त्यांचे काही डायलॉग चांगलेच गाजले.
हार घातल्याने हार होत नाही, हारला असं कुणी म्हणाला तरीबी हार होत नाही, पण एकदा की माणसानं हार खाल्ली की मग कितीबी हार घाला विजय होत नाही.
सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो.
बाईनं चूल सोडून भलत्या भानगडीत पडावं कशाला, गायीचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही, बायकाचं काम रडायचं लढायचं नाही..
निवडणुकीची निशाणी लई वाईट मिळाली वस्तरा आणि म्हैस
गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं, तुम्ही साडे सोळावे