Roshan More
या वर्षी तब्बल पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काही राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आसामध्ये भाजप सत्तेत आहेत. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 20 मेला संपणार आहे. त्यामुळे या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
केरळ विधानसभेची निवडणूक देखील याच वर्षी होणार आहे. मे महिन्यात केरळमध्ये नवीन सरकार स्थापन होईल.
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ देखील 10 मे रोजी संपत आहे. त्यामुळे या राज्यात देखील निवडणुका होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये देखील यंदा निवडणुकीचा बार उडणार असून एप्रिल-मे महिन्यात येथे निवडणुका होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये देखील यंदा निवडणूक होणार आहे.
पाचही विधानसभांचा कार्यकाळ हा मे महिन्यात संपत असल्याने एप्रिल महिन्यात निवडणूक होऊन नवीन सरकाराचा शपथविधी मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजप तर आसामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे.