Jagdish Patil
बांगलादेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर नव्या पंतप्रधानांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
या चर्चांमध्ये बीएनपीचे कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान यांचं नाव आघाडीवर असून ते तब्बल १७ वर्षांनी मायदेशी परतले आहेत.
२००८ मध्ये कायदेशीर आणि राजकीय वादांमुळे हे तारिक रहमान कुटुंबियांसह लंडनला गेले होते.
तारीक यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी असलेल्या जुबैदा यांचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
जुबैदा यांचा जन्म १८ मे १९७२ रोजी सिलहट येथे झाला. त्यांनी ढाक्यातून MBBS पूर्ण केलं आणि फेब्रुवारी १९९४ मध्ये तारिक यांच्याशी लग्न केलं.
जुबैदा २००८ मध्ये स्टडी लिव्हवर लंडनमध्ये असताना प्रतिकूल राजकीय परिस्थितीमुळे त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.
जुबैदा यांचे वडील रिअर ॲडमिरल महबूब अली खान हे नौदल प्रमुख आणि मंत्रीही होते.
२००८ मध्ये, झुबैदा पती तारिक यांच्यासह सासू यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी आयोगाने कारवाई केली.
ज्यामध्ये ३ वर्षांच्या तुरुंगवास आणि 35 लाख टका दंड ठोठावण्यात आला होता.
तारिक यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा कट रचणे अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप देखील ठेवण्यात आला होता.