Ganesh Sonawane
मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याने महाराष्ट्रात राजकीय युद्ध भडकलं.
त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वाद आणखी भडकला.
टिपू सुलतान यांच्यावरुन याआधीही महाराष्ट्रात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.
टीपू सुलतान (Tipu Sultan) हे १८ व्या शतकातील एक वादग्रस्त शासक होते. त्यांना "म्हैसूरचा वाघ" (Tiger of Mysore) असेही म्हणतात.
टीपू सुलतान यांचा मृत्यू १७९९ मध्ये सेरिंगपट्टणमध्ये ब्रिटिशांशी लढताना झाला.
अनेकजण त्यांना ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध लढणारा स्वातंत्र्यसेनानी मानतात.
काही इतिहासकार त्याच्यावर लाखो हिंदूंवर अत्याचार-हत्या, जबरदस्तीने धर्मांतर, मंदिरांचा विध्वंस केल्याचे आरोप ठेवतात (उदा. कोडगु, मलाबार भागात).
आजही टीपू सुलतान यांच्यावरुन राजकीय वाद होतात – काही ठिकाणी "महानायक" तर काही ठिकाणी "खलनायक" म्हणून चर्चा होते.
भाजप व हिंदुत्वादी संघटना टीपू सुलतान याने लाखो हिंदूची हत्या केल्याचे सांगतात.
तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान यांनी कधीच विषारी विचारांना थारा दिला नाही. शौर्याच्या बाबतीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे असे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान यावरुन भाजप आक्रमक झाली. भाजपच्या इशाऱ्यानंतर मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या कार्यालयातील टिपू सुलतानची प्रतिमा काढण्यात आली आहे.