सरकारनामा ब्यूरो
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.
सरकारने तरुण, महिला, गरीब तसेच शेतकरी या चार प्रमुख गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी गेल्या 10 वर्षांत देशात महिलांचे सक्षमीकरणबाबत माहिती दिली.
'विकसित भारत' बनण्यासाठी देशाच्या महिलांची क्षमता वाढणे आणि त्यांना सशक्त करणे गरजेचे आहे.
ही योजना महिलांसाठी सर्वोत्तम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यास सक्षम करते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी SHG (Self Help Group) कर्जात 3 कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी स्वयं-सहायता गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
या गटांनी जवळपास एक कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र केले आहे.
नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणास प्रोत्साहन दिले जाईल.