Chetan Zadpe
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येतील वाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांच्याकडून दरवर्षी भविष्यवाणी जाहीर करण्यात येते,
आम्ही जाहीर करत असलेली भविष्यवाणी 70 ते 75 टक्के नेहमी खरे ठरणारे असते, असा दावा वाघ महाराजांनी केला आहे.
आमच्या भाकितांना वैज्ञानिक आधार नसेल. मात्र नैसर्गिक आधार जरुर आहे. कारण निसर्गाच्या गोष्टींवरुन आम्ही भाकीत करत असतो, असं वाघ महाराज सांगतात.
साधरण 315 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलडाण्यातल्या भेंडवळ इथे घटमांडणीची परंपरा सुरू केली. अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतात घटाची मांडणी करतात.
शेतजमीनीत 1 फूट खोल खड्डा खणला जातो. खड्ड्यातून 4 ढेकळं बाहेर काढतात. हे ढेकळं म्हणजे 4 महिन्यांचं पावसाचं प्रतीक म्हणून मानलं जातं.
विदर्भातले अनेक शेतकरी या भेंडवळच्या या भविष्यवाणीवर श्रद्धा ठेवून आहेत. यानुसारच ते आपल्या शेतीचे नियोजन करतात.
या 4 ढेकळांवर पाण्यानं मातची मडकी पाणी भरुन ठेवले जाते. या मडकींवर करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवतात.
रात्रभर या घटाला तसंच ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी घटात झालेल्या बदलांचं निरीक्षण करतात, त्यावरुन भाकीत वर्तवलं जातं.