Jagdish Patil
भोपाळमधील गॅस दुर्घटनेच्या भयानक आठवणी काल बुधवारी रात्री पुन्हा तब्बल 40 वर्षांनी ताज्या झाल्या.
भोपाळमध्ये यूनियन कार्बाइड कंपनीतून विषारी वायूची गळती झाल्यानंतर 5 हजारांहून अधिक जणांचा तडफडून मृत्यू झाला होता.
त्याच कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट बुधवारी (ता.01) लावण्यात आली, तो कचरा घेऊन जाताना मार्गावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.
मध्य प्रदेश सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आणि जवळपास 337 टन विषारी कचरा 12 सीलबंद कंटेनरमधून हलवण्यात आला.
भोपाळपासून 250 किलोमीटर अंतरावरील धार जिल्ह्यातील पीथमपूर येथील MIDC मध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.न
भोपाळमधील यूनियन कार्बाइड कंपनीमध्ये 2-3 डिसेंबर 1984 च्या रात्री विषारी वायूची गळती झाल्यामुळे 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
यामुळे हजारो लोकांना अपंगत्व आले होते. जगभरातील कंपन्यांमधील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक घटना म्हणून याकडे पाहिले जाते.
कंपनीतील या विषारी कचऱ्याची विल्हेवाट आतापर्यंत लावली नसल्यामुळे MP हाय कोर्टाने हा कचरा 4 आठवड्यात न हलवल्यास अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार पीथमपूर येथील औद्योगिक कचरा प्रकल्पामध्ये हा सर्व कचरा जाळला जाणार आहे. त्यानंतर उरलेली राख पाणी किंवा मातीच्या संपर्कात येणार नाही, यासाठी ती सुरक्षितपणे झाकली जाणार आहे.