Mahayuti Government Decision: लाडक्या बहिणींच्या 2100 साठी आखडता हात; पण महायुती सरकारचं सर्वसामान्यांसाठी 'हे' मोठं गिफ्ट

सरकारनामा ब्यूरो

अर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्यात सर्वसामान्यांसाठी राज्यसरकारकडून मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

State government decision | Sarkarnama

महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. यांचा वीज नियामक आयोगाकडून निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला. तर काय आहे या निर्णयात वाचा...

State government decision | Sarkarnama

काय आहे कारण?

महावितरण कंपनीने प्रस्ताव पाठवण्याचे कारण म्हणजे उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. यामध्ये एका ठराविक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.

State government decision | Sarkarnama

किती टक्के वीज होणार कपात?

यात वीज नियामक आयोगाकडून आलेल्या आदेशानुसार, 2025-26 या वर्षासाठी वीजदरात सुमारे 10 टक्के कपात होणार आहे.

State government decision | Sarkarnama

अजित पवार

यात महायुती सरकारने नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या 5 वर्षांचे महाराष्ट्रातील विजेचे दर कमी होणार असल्याची घोषणा केली होती.

Ajit Pawar | sarkarnama

वीजदर

टाटा कंपनीचे 18 टक्के, अदानी कंपनीचा वीजदर सरासरी 10 टक्के, तर बेस्टचा वीजदर 9.82 टक्क्यांनी 1 एप्रिलपासून कमी होणार आहेत.

State government decision | Sarkarnama

स्वस्त वीज उपलब्ध होणार-

येणाऱ्या पाच वर्षात अपारंपरिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने पुढे वीजदर कमी होणार आहेत.

State government decision | Sarkarnama

मुंबईसाठी वीजदर ठरेल का लाभदायक?

मुंबईसाठी मात्र हा निर्णय लाभदायक असेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदर कमी झाल्यास उत्पादन खर्चात घट होईल.

State government decision | Sarkarnama

NEXT : जिद्द असावी तर अशी; कठोर परिश्रम घेत पोरीनं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलंच...

येथे क्लिक करा...