सरकारनामा ब्यूरो
IPS अधिकारी अमिताभ यश यांनी 1996 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
बिहारच्या भोजपूर येथील अमिताभ यांनी त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथून पूर्ण केले.
वडिलांची पोलिसात नोकरी असल्याने अमिताभ यांनी लहानपणापासूनच पोलिस ठाणे आणि चौक्या त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या.
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी आयआयटी कानपूरमधून रसायनशास्त्रात मास्टर्स केले.
अमिताभ हे विशेष टास्क फोर्स प्रमुख झाले. तेव्हापासून गुन्हेगारांमध्ये त्यांची अधिक दहशत निर्माण झाली.
शौर्यामुळे चर्चेत असलेले अमिताभ हे प्रत्येक केसमध्ये चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात.
पोलिसिंगची शैली इतरांपेक्षा वेगळी असल्याने त्यांच्या पराक्रमाचे किस्से प्रसारमाध्यमांमधून दिसून येतात.
150 हून अधिक एन्काउंटर केलेल्या अमिताभ यांच्याशी पंगा घेणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट हा एकतर मृत्यू किंवा तुरुंगातच झाला आहे.
R