Rashmi Mane
कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिच्या या वक्तव्यांमुळे भाजपला अनेकवेळा दोन पावले मागे यावे लागले आहे.
आता कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात शीख समुदायाचे प्रतिमा हनन करण्यात आल्याची याचिका न्यायालयात दाखल झाली आहे.
अभिनयाच्या बळावर बॉलीवूडची क्वीन अशी ओळख निर्माण केलेल्या, चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कंगणा यांचे सामान्यज्ञान इतकेही कच्चे असू शकत नाही. मात्र अनेकदा तिने वाद ओढवून घेतला आहे.
. 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारताचे पहिले पंतप्रधान असा उल्लेख कंगणाने एका टीव्ही शोमध्ये केला होता. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना प्रत्येकी शंभर रुपये मिळाले होते, हे विधान कंगना यांना खूपच महागात पडले. ज्यामुळे विमानतळावर सीआएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कंगणांच्या कानशिलात लगावली होती.
आंदोलनातील शेतकऱ्यांचा उल्लेख कंगणा रनौत यांनी खलिस्तानी असाही केला होता.
'देशाचे नेतृत्व, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नसते तर पंजाब हे बांग्लादेश बनले असते,' या कंगणा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला होता.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगणा यांनी त्यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती. ज्यामध्ये 'कंगणा यांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीऱशी केली होती'.