Jagdish Patil
भाजप नेते के. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत, 'बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही. तर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे', असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना भाजपवर टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळालं आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईला बॉम्बे हे नावं कोणी दिलं होतं आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊया.
मुंबईची जगभरात स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे सुंदर आणि व्यावसायिक शहर आहे.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मुंबईचं मोठं योगदान असल्यामुळेच या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं.
या शहराला कुणी बॉम्बे, तर कुणी बंबई म्हणायचं. तसंच मुंबा, मुंबापुरी या नावांनीही मुंबई ओळखली जायची.
या सर्वांमध्ये 'बॉम्बे' या नावाचा वापर जास्त प्रमाणात केला गेला. तरीही इतिहासात मुंबई नावाचेच अनेक संदर्भ आढळतात..
कोळी मच्छीमार समुदायाची देवी मुंबादेवीच्या नावावरून या शहराला मुंबई हे नाव पडलं.
युरोपियन आक्रमणादरम्यान पोर्तुगीज लोकांनी या शहराला 'बॉम्बेम' म्हणून संबोधलं होतं. बॉम्बेमचा अर्थ 'गुड बे' म्हणजे चांगले बंदर.
सतराव्या शतकात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतहून मुंबईत आणले तेव्हा त्यांनी 'बॉम्बेम'चे 'बॉम्बे' असे नाव केले.
तेव्हापासून 'बॉम्बे' नाव प्रचलित झालं. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारामुळे नोव्हेंबर 1995 मध्ये केंद्र सरकारने अधिकृतपणे या शहराचे नाव मुंबई असे केले.