सरकारनामा ब्यूरो
आधुनिक मुंबईचे जनक म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ शंकरशेठ हे उत्कृष्ट समाजसुधारक होते.
19व्या शतकातील आधुनिक मुंबईच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
मुंबईतील महत्त्वाची बांधकामे, पथदिवे तसेत पायाभूत सुविधांमध्ये शिक्षण आणि लोककल्याणाची कामे पार पडली.
मुंबईच्या पायाभूत रचनेतील काही विकासकामे आणि बांधकामे आजही त्यांच्या नावाने ओळखली जातात.
देशातील बोरी बंदर ते ठाणे या पहिल्या रेल्वे बांधकामात त्यांनी जमशेदजी जीजीभाय यांना मदत केली.
रेल्वे टर्मिनल बांधण्यासाठी जागा आणि येथे रेल्वे बुकिंग कार्यालयासाठी त्यांचा बंगलाही दिला.
जमशेटजी आणि शंकरशेठ हे दोघेही पुढे 'द ग्रेट इंडियन पेनिन्सुला' रेल्वेचे एकमेव भारतीय संचालक बनले.
दक्षिण मुंबईतील रुंद मोकळे रस्ते, हवेशीर गल्ल्या आणि किल्ल्याच्या आजूबाजूच्या भव्य इमारतींचे सध्याचे स्वरूप या दोन व्यक्तींनी दिले.
स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना तसेच गटारे आणि नाल्यांची संकल्पना मांडणारे ते पहिले भारतीय होते.