Deepak Kulkarni
देशातील केंद्र सरकार 17 वर्षांनंतर टोल वसुली पध्दतीत मोठे बदल करण्याच्या विचारात आहे.
लवकरच राष्ट्रीय महामार्गांवर टोल जमा आणि मॅनेज करण्याच्या पद्धती बदलल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारकडून करण्यात येत असलेल्या या बदलांमुळे टोल शुल्क वसुलीत अधिकची पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी या बदलांमुळे टोल वसुली प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक उत्तमप्रकारे कार्यरत राहील.
केंद्र सरकारची नवीन प्रणाली लागू झाल्यावर, वाहनाची नंबर प्लेट देखील फास्टॅगशी जोडलेल्या बँक अकाउंटसोबत जोडली जाईल. जेणेकरून वाहन टोलवर पोहोचताच कॅमेरा नंबर प्लेट ओळखेल आणि टोल टॅक्स कापेल.
फास्टॅगऐवजी वाहनांच्या नंबर प्लेटवरून टोल टॅक्स कापला जाणार आहे.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे म्हणजेच ANPR कॅमेरे टोलनाक्यांवर बसवले जाणार आहेत. त्यांच्या मदतीने फास्टॅगऐवजी वाहनांच्या नंबर प्लेटवरून टोल टॅक्स कापला जाईल.
टोल दरांची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध राहणार आहे. वाहनधारकांना किती टोल किती आणि कशासाठी घेतला जात आहे, हे सहज समजणार आहे.
टोल प्लाझावरील प्रतीक्षेचा कालावधी फास्टॅगच्या समस्या कमी झाल्यामुळे कमी लागणार आहे.