Aslam Shanedivan
हुतात्मा जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसेच कायदेशीर वारसदारांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासनाकडून उदरनिर्वाहासाठी दिलेल्या शेती जमिनीचे हस्तांतरण किंवा वाटप करताना कुठलेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
याबाबतची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी महसूल विभागाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शहीद कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत.
तर पूर्वी जमीन नावावर करताना हुतात्मा जवानांच्या वारसदारांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता, तो आता पूर्णपणे रद्द झाला आहे
ही सवलत मिळवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा स्थानिक महसूल विभाग यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल